हे अवलंबून असायचे कि गड आहे कि दुर्ग
आणि गड आहे तर तो भुईकोट (भुई=जमीन आणि कोट=संरक्षण) आहे किंवा डोंगराळ
पण बहुतेक गडांचे बांधकाम हे एका विशिष्ट पद्धतीनेच व्हायचे जसे कि 'गोमुखी' किंवा मुख्य आणि इतर दरवाजे ह्याच पद्धतीचे असायचे
ह्याचे कारण म्हणजे 'पुढच्यास ठेच आणि मागचा शहाणा'
राजपूत किंवा अगदी यादव आणि विजयनगर साम्राज्याचा ह्रासाचे एक मुख्य कारण म्हणजे गड
पूर्वी,जसे पौराणिक मालिकांमध्ये दाखवायचे , किल्ल्याचा दरवाजा हा थेट हल्ला किंवा तोफेच्या माऱ्याच्या थेट टप्प्यात असायचा!
त्यामुळे थेट दरवाजा तोडून शत्रूंना आत घुसायला जास्त वेळ लागायचा नाही आणि अर्थातच नंतरचा नग्न इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे.
अश्याच पद्धतीने अल्लाउद्दीन खिलजी, अकबर किंवा इतर विदेशी आक्रमकांनी हल्ले करून आपल्या आया- बहिणीची अब्रू लुटली आणि आपल्या भावांना हुतात्मा केले.
ह्यातूनच धडा घेवून युगप्रवर्तक छत्रपती महाराजांनी गडांची रचना हि गोमुखी करायला सांगितली (चित्र जोडले आहे)
ह्यामुळे गडाला एकप्रकारे असा आकार येतो कि चहोबाजूने फक्त तटबंदी च दिसते
त्यामुळे जिथे गडात प्रवेश करण्याचा मार्गच दिसत नाही तिथे दरवाज्यावर हल्ला करून आत प्रवेश करणे दूरच!
त्यामुळे प्रत्यक्ष हल्ल्या पेक्षा अगोदर दरवाजा शोधायलाच वेळ जायचा, तो पर्यंत गडावरील मराठे संदेश पोहोचवून ,बाहेरून मराठ्यांची तुकडी हल्ला करायचे आणि गनीम गडाबाहेरील आणि गडाच्या आतील फौजेच्या मधात भरडला जायचा.
तसेच गडाचा दरवाजा तोडायला जो आवश्यक runway लागतो तितकी सुद्धा जागा नसायची ह्या गोमुखी संरनचनेत!
त्यामुळे अर्थात गनिमांचा बराच वेळ खर्च कष्ट आणि ऊर्जा बिनकामाची खर्च व्हायची आणि त्यातूनच गडावरील मराठयांचा मारा असायचाच!
ह्याचा प्रत्यय फक्त एकाच गोष्टीवरून येतो कि रामशेज सारखा छोटा भुईकोट किल्ला घ्यायला मुघलांना ६ वर्ष झुंजावे लागले ते हि त्यांना लाच देऊन घ्यावा लागला,
अर्थात किल्लेदाराने योग्यच निर्णय घेतला होता, नंतर त्याच किल्लेदारांनी तोच रामशेज अगदी एका रात्रीत फक्त ३०० मावळ्यानिशी परत स्वराज्याच्या सेवेत आणला!