शुक्रवार, २७ जानेवारी, २०२३

छत्रपती शिवाजी महाराज यांचा रणसंग्राम

;छत्रपती शिवाजी महाराज यांचा सामोरा समोर औरंगजेब का खेटला नाही व औरंगजेब दखनन मध्ये का आला नाही सदा वेळी त्याचा सरदार ना का पाठवायचाbr>जो दिल्ली चा आलमगीर समजायचा तो नुसता दखनन मध्ये येऊ शकला नाही तो कसल दिल्ली चा आलमगीर हा तर पळकुट्या निघाला औरंगजेब  


थोडक्यात 👇👇

त्याने प्रथमच शिवाजीराजे हे नाव ऐकले (इ.स.१६५०-५५ दरम्यानच्या काळात).यानंतर पुढील जवळजवळ तीन दशके त्याने छत्रपतींचा झंझावाती पराक्रम बघितला.


जुन्नरची लूट,अहमदनगरवरील हल्ला,अफजलखान स्वारी व वध,सिद्दी जौहर स्वारी व पन्हाळगडावरून सुटका,कारतलबखानाचा पराभव,शायिस्तेखानाची स्वारी व लाल महालातील छापा,दिलेरखानाची फजिती,सुरतेची दोनदा लूट,जसवंतसिंहाचा पराभव,बाजी घोरपडेचा वध या सर्व प्रकरणांमुळे त्याला महाराजांच्या पराक्रमाची चांगलीच कल्पना आली होती.याचा कळस झाला तो मात्र आग्र्याचा दरबार,दरबारातील महाराजांचा 'तो' स्वाभिमानी बाणा व त्यानंतरचे राजकारण व सर्वांत शेवटी आग्र्याहून धाडसी सुटका.


यानंतर आग्र्याहून परतल्यानंतर चार वर्षांनी महाराजांनी पुन्हा एकदा दिल्लीच्या दिशेने हर हर महादेव चा उदघोष केला व त्यानंतर अशी घौडदौड केली की पुरंदरच्या तहाचे घाव,आग्र्यातील अपमान सारे सारे व्याजासकट धुवून निघाले.महाराजांच्या पराक्रमी भवानी तलवारीने पुन्हा त्यानंतर कधीही म्यान बघितली नाही.आग्र्यातील स्वतःची फजिती, पुरंदरच्या तहात मिळालेले २३ किल्ले गमावणे,सुरत व कारंजाची लूट,साल्हेरचा संग्राम व मुघलांचा दणदणीत पराभव,दिंडोरीची लढाई व पराभव यांसारख्या घटनांमुळे तो अस्वस्थ झालेला होता.


या पराक्रमाचा सर्वोत्कृष्ट कळसाध्याय म्हणजे महाराजांचा राज्याभिषेक,छत्रपतीपद धारण करणे आणि दक्षिण दिग्विजय होय.याचप्रमाणे बहादूरखान,दिलेरखान यांचा केलेला पराभव होय.या सर्व घटनांमुळे तत्कालीन प्रबळ व वैभवशाली अशा हिंदवी स्वराज्याची व राजा शिवछत्रपतींच्या सामर्थ्याची सर्व सुलतानांना विशेषतः औरंगजेबाला पुरेपूर कल्पना आली होती.


जर औरंगजेब महाराज हयात असताना दख्खनमध्ये उतरता,तर त्याला त्याचा,त्याच्या लाल किल्ल्यासकट संपूर्ण मुघल साम्राज्याचा वसीयतनामा (वारसापत्र) तयार करूनच दख्खनमध्ये पाऊल टाकावे लागले असते.


जर तो राज्याभिषेक सोहळ्यानंतर दख्खनमध्ये ससैन्य आला असता,तर


त्याला महाराजांनी प्रत्यक्ष स्वराज्यात घुसू न देता स्वराज्याच्या सीमेबाहेरच बुकलले असते.

जरी तो स्वराज्यात आला असता,तर त्याला एकतर

मृत्यू स्वीकारावा लागला असता.

अंतिम पराभव स्वीकारून कैद पत्करावी लागली असती.

अन्यथा नेहमीसारख्या महाराजांच्या अचाट प्रयोगामुळे त्याची जबरदस्ती फजिती होऊन त्याला परत दिल्लीला परतावे लागले असते.थोडक्यात पराभवच नशिबी आला असता.

आपण जर स्वत:हून दख्खनेत मोहिमेवर गेलो,तर आपली जागतिक प्रतिष्ठा धुळीला मिळेल,दख्खनमध्ये तिची माती होईल,मुघल साम्राज्याला घरघर लागेल,तिला कुणीही वाली राहणार नाही,अशी भीती त्याला मनात होती.हे खरेच होते.कारण औरंगजेबानंतर मुघल साम्राज्याला कुणी समर्थ बादशहा लाभला नाही.औरंगजेबाच्या मृत्यूसोबतच मुघल साम्राज्याचेही पतन सुरु झाले.

औरंगजेबाची व छत्रपतींची पहिली व शेवटची भेट ही आग्य्राच्या दरबारात झाली.जर दुसरी भेट राज्याभिषेकानंतर झाली असती,तर ती केवळ रणांगणावरच झाली असती.शिवाय दोघेही आग्रा प्रकरणामुळे संतप्त झाले असल्यामुळे जी गाठ पडली असती,तर ती रणांगणावरच पडली असती.यावेळी महाराजांनी अद्वितीय रणकौशल्य दाखवून व अप्रतिम व्यूहरचना आखून नक्कीच औरंगजेबाचा पराभव केला असता.अवघ्या मराठ्यांनी मग अखिल हिंदुस्थानात नुसता हलकल्लोळ केला असता व उच्छाद मांडला असता.

या सर्व शक्यतांमुळे व मनातील भीतीमुळे औरंगजेबाने महाराज हयात असेपर्यंत दख्खनमध्ये यायचे टाळले.यामुळेच त्याने त्याच्या विविध सरदारांना आळीपाळीने स्वराज्यावर स्वारी करण्याचा आदेश दिला;मात्र तो प्रत्यक्ष आला नाही.महाराज निवर्तल्यानंतर मात्र दोन वर्षांनी स्वतः पाच लाखांच्या सैन्यासह आला व या दख्खनच्या मातीतच कायमचा गाडला गेला.

यातच महाराजांची थोरवी दिसून येते.


जय भवानी !! जय शिवाजी !! 🚩🚩

धुरंधर

धुरंधरधुरंधरधुरंदर' मी बघितला मला आवडला.चित्रपटात खूप वाखाणण्याजोग्या बाबी आहेत तर काही मुद्दाम घुसडलेल्याही आहेत.त्या मास पब्लिकला कदाच...